सती म्हटलं की पतीच्या चितेसह पत्नीने जिवंत जळण्याची अनिष्ट प्रथा आपल्यापैकी
अनेकांना आठवेल. आता आपल्या समाजातून हद्दपार झालेली ही परंपरा नेमकी कुठून सुरू
झाली असावी याचा शोध घेतल्यास दाक्षायणीच्या कथेचा संदर्भ येइल. दाक्षायणी म्हणजे
विश्वेश्वर महादेवाची पहिली पत्नी. तिच्या पित्याकडे, प्रजापती दक्षाकडे असलेल्या महायज्ञाचं जावई असुनसुद्धा महादेवाला आमंत्रण
नव्हतं. तरिसुद्धा आपल्या पित्याकडचा यज्ञ म्हणुन ती तिथं गेली. यज्ञस्थळी सर्व
उपस्थीतांसमोर महादेवाचा झालेला अपमान असह्य झाल्याने तीने त्याच यज्ञकुंडात
आत्माहूती दिली. शिवनिंदा श्रवण करण्यालाही महापाप मानुन दाक्षायणीने स्वतःच स्वतःसाठी
घेतलेलं हे प्रायश्चीत्त होतं. यात तीने जी आत्माहूती दिली त्यानंतर तीला सती हे
नामाभिधान मिळालं असावं. आपल्या पतीच्या सन्मानासाठी जीव देणे ही त्याच्याप्रती
असलेल्या भक्ती वा प्रेमाची सर्वोच्च सिमा आहे असं मानुन त्या काळात सती हे नाव
देऊन दाक्षायणीचा गौरव करण्यात आला असावा. सन्मानासाठी जीव देणे ही गोष्ट आपल्या
संस्कृतीत नेहमीच गौरविली गेली आहे. मोगल आक्रमणांच्या काळात हजारो राजपुत
स्त्रीयांनी सन्मानासाठी केलेले 'जोहर' आजही अभिमानानेच उल्लेखले जातात. त्याचप्रमाणे दाक्षायणीचा सती हा उल्लेख
तीच्याप्रती, तीने केलेल्या कृत्याप्रती आदर म्हणुनच
केला गेला असेल.
मात्र कुठल्याही गोष्टीचा विपर्यास करून ती अत्यंत विकोपाला नेऊन ठेवणे हेच
आपल्या समाजाचं दुदैव आहे. म्हणुनच पुढे या कथेचा विपर्यास होउन पतिनिधनानंतर
त्याच्या शवासह स्वतःला जाळून घेण्याच्या प्रथेला सती हेच नाव मिळालं आणि 'सती जाणे' ही पद्धत सुरू झाली. नंतर जबरीने
बायकांना सती जाण्यास लावण्याची अमानुष पद्धतही सुरू झाली, आणि सती म्हणजे आत्मभान विसरून
पतीच्या शवाबरोबर स्वतःला संपवणारी स्त्री अशीच धारणा तयार झाली. आत्मभान नसणा-या
काही अवलीया स्त्रीयांनाही मग 'सतीमाय' म्हणवले जाऊ लागले. थोडक्यात काय, स्वतःला विसरून गेलेल्यांचं नाव सती झालं आणि मुळ संकल्पनेचा पार बट्ट्याबोळ
झाला.
आता दाक्षायणीच्या कथेचा पुढचा भाग पाहू. सतीच्या आत्माहूतीनंतर शिवकोपाचा जो
उद्रेक झाला तो आपणा सर्वांना माहितीच आहे. सतीचं पेटतं शव घेऊन शोकमग्न फिरणा-या
शिवाला शांत होण्यासाठी कित्येक वर्ष
लागली असं म्हणतात. तिच्या पेटत्या शवाचे तुकडे जे पृथ्वीवर पडले त्यातून भारत
देशभर शक्तीपिठांची निर्मीती झाली, असंही मानतात.
आपल्या देशात असलेल्या शक्तीपिठांच्या आकड्याबाबत संभ्रम आहे. ती चार
आदिशक्तीपिठं, अठरा महाशक्तीपिठं, की एकावन्न शक्तीपिठं आहेत, की एकुण चौसष्ट मंदिरं
आहेत, हे अजुनही नेमकं सांगता येत नाही. याल
वेगवेगळे संदर्भ आहेत. मात्र कुठल्याही शक्तीपिठाची मुळधारणा ही दाक्षायणीची कथा
आहे, हे मात्र नक्की. यापैकी जवळपास
प्रत्येकच मंदिरांस स्वतःची अशी उत्पत्तीकथा आहे. तरीसुद्धा सतीच्या कथेचा संदर्भ
देऊन करून दिलेली या शक्तीपिठाची ओळखच महत्त्वाची ठरते. म्हणुनच शक्तीपिठ म्हटलं
की या ठीकाणी सतीच्या शरीराचा कोणता अवयव पडला होता? हा प्रश्न भक्तांना आधी पडतो.
मग माहूरमध्ये सतीचा उजवा हात पडल्यामुळे ते मुळपिठ ठरतं, कोल्हापुरमध्ये डोळे पडल्यामुळे ते जागृत दैवत होतं तर वैष्णोदेवीमध्ये देवीचं
शिर पडल्यामुळे तीथे 'साचा दरबार' भरतो. देवीच्या अनेक रूपांच्या निर्मितीची मुळकथा ही दाक्षायणीची, सतीची कथा ठरते. म्हणुनच देवीच्या ईतर रूपांची आदिकारीका म्हणुन 'सती' हे आदिशक्तीचं पहिलं सगुण रूप आणि नऊ
रूपांपैकी दुसरं नाव ठरतं.
No comments:
Post a Comment