'इतना सन्नाटा क्यु है भाई?' हा काही 'आज खुष तो बहोत होंगे तुम' सारखा पल्लेदार संवाद नाही. 'मेरे पास मा है' सारखा सुपरपॉवरफुल पंचही त्यात नाही. 'आय़ हेट टिअर्स' सारखा तो एका सुपरस्टारच्या तोंडून येत नाही, किंवा 'कितने आदमी थे?' सारखा तो सुपरव्हिलनच्या तोंडूनही येत नाही. तरीही या सर्व संवांदांईतकंच महत्त्व चित्रसृष्टीच्या ईतीहासात 'इतना सन्नाटा क्यु है भाई?' ला देखील प्राप्त झालं आहे. हा संवाद लिहणा-या सलीम-जावेद या जोडीइतकं, आणि त्याची कल्पकतेनं रचना करणा-या रमेश सिप्पींच्या दिग्दर्शनाईतशकंच; किंबहुना या सगळ्यांहून जास्तच कसब या संवादाच्या वेळी मानावं लागेल ते रहिम चाचा रंगवणा-या ए के हंगल यांचं!! सन्नाटा क्यु है विचारणारे रहिम चाचा आता आपल्यात नाहीत. आपल्यासाठी ते सोडून गेलेत फक्त... सन्नाटा!
ए के हंगल पंचाण्ण्यव वर्षांचे होते. अनेक महिन्यांपासुन ते आजारी होते. त्यांच्यापेक्षा उण्यापु-या पाच वर्षांनी मोठ्या असलेल्या भारतीय चित्रसृष्टीशी त्यांचं नातं मात्र कायम होतं. अगदी हल्लीच, म्हणजे दोन वर्षांपुर्वी त्यांनी रिलायन्सच्या 'क्रिष्णा और कंस' या ऍनिमेशनपटात महाराज उग्रसेनासाठी रेकॉर्डिंग केलं होतं. हा सिनेमा या जन्माष्टमीच्या मुहुर्तावर प्रदर्शित करतांना "ए के हंगल यांनीही मोठ्या उत्साहाने आमच्यासाठी रेकॉर्डींग केलं," हे बिग ऍनिमेशन्सच्या आशिष कुलकर्णींनी किती म्हणुन अभिमानाने सांगीतलं होतं! 'मेकिंग ऑफ क्रिष्णा' मध्ये ए के हंगल यांचा स्पेशल बाईटही घेतलेला होता. ऍनिमेशनपटासाठी रेकॉर्डींग करणं ही कल्पनाच पुर्णतः नवीन असल्यामुळे आपण याला नवे आव्हान म्हणुन स्विकारल्याचं तेव्हा हंगल यांनी सांगींल्याचं लक्षात आहे. वयाची शंभरी गाठत असतांना नव्या कल्पनांचा आव्हान म्हणुन स्विकार करणा-या या 'ओल्ड मॅन' ला कोण बरं ओल्ड म्हणेल?
पण हंगल यांना 'ओल्ड मॅन' हेच बिरूद कायमचं जोडल्या गेलेलं होतं. सिनेमा समजायला लागला तेव्हापासुन त्यांना म्हाता-याच्याच भुमिकेत पाहिल्याचं आठवतं. टिव्हिवरच्या कुठल्याश्या कार्यक्रमात 'अनेकांना चिरतारूण्याचं वरदान लाभतं तसं हंगल यांना चिरवार्धक्याचं वरदान लाभलंय' असली काहीतरी टिप्पणी ऐकलेली आज आठवतेय. वार्धक्य हे वरदान म्हणावं की नाही, हा प्रश्नच आहे, पण हंगल यांनी मात्र त्याचा उपयोग वरदानासारखाच केला, हे सांगणे न लगे.
बावर्ची मधला त्यांनी रंगवलेला मोठा काका असो, किंवा 'ओ हो हो दिपिकाजी आईये आईये' म्हणणारा त्यांचा हसमुख दुकानदार असो, 'नरम गरम' मधला त्रस्त झालेला कुशी चा बाप असो किंवा अगदी लगान मधला त्यांचा 'पानी तो बरसाओ' म्हणुन आकाशाकडे टक लावून पहाणारा गावातला सर्वात वयोवृद्ध म्हातारा असो; यात त्या त्या व्यक्तीरेखेबरोबरच तितक्याच प्रभाविपणे लक्षात राहतो तो ए के हंगल नावाचा कलाकार!
हंगल यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं तेच मुळी त्यांच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी. त्यामुळे चरित्र भुमिका हेच त्यांचे क्षेत्र राहणार हे नक्कीच होतं. चित्रपटसृष्टीत येण्याआधी आणि त्यानंतरही हंगल कम्युनिस्ट पक्षाचे खंदे कार्यकर्ते होते आणि राहिले. त्यांच्या जुन्या आणि पक्क्या साम्यवादी विचारांच्या पायाचा वापर त्यांनी रंगमंच आणि नंतर चित्रपटसृष्टीमध्येही एक आदर्शवादी आणि सामान्य भारतीय मध्यमवर्गीय व्यक्तीरेखा उभ्या करतांना खुप चांगल्या पद्धतीने करून घेतला. आर के लक्ष्मण यांचा 'कॉमन मॅन' हंगल यांच्यासारखा दिसत नसेलही कदाचित; पण ईंडियन कॉमन मॅन म्हटलं की हंगल यांनी रंगवलेल्या व्यक्तिरेखाच समोर येतात.
समाजकारण, रंगमंच, चित्रपटक्षेत्रातली चार दशके, टिव्हीवर गाजवलेला एक काळ, आणि नुकतीच बदलत्या काळातल्या डेली सोपमध्ये 'मधुबाला' च्या माध्यमातुन घेतलेली एक छोटीशी एन्ट्री -- ए के हंगल या एका व्यक्तीने पंचाण्णव वर्षाच्या आयुष्यात केलेलं मल्टीटास्कींग थक्क करणारं आहे. हे सगळं करतांना आपला व्यासंग, विचार आणि 'सन्नाटा' यांच्याशी असलेलं आपलं नातं त्यांनी नेहमी जपलं. त्यांचं काम सुरू राहिलं ते त्यांनी केलेल्या भुमीकांप्रमाणेच साध्या आणि सरळ पद्धतीने. चित्रसृष्टीने त्यांची हवी तशी दखल घेतली, न घेतली हा विषय हंगल यांच्या उतारवयात त्यांच्यासाठी फार अलाहिदा होता. स्टॅंड-अप कॉमेडी शोजचं भरमसाठ पीक येऊ लागलं तेव्हा हंगल साहेब आणि त्यांचा सन्नाटा हा विनोदाचा विषय झाला.
हंगल साहेबांनी याकडे लक्ष दिलंच नाही. नवं काहीतरी करण्याचा त्यांचा शोध सुरू राहिला.
या वर्षी चित्रपटसृष्टीला शंभर वर्ष पुर्ण झालीत की तीची शंभर वर्ष भरलीत हे कळायला मार्ग नाहीय. देव आनंद, राजेश खन्ना, दारा सिंग, आणि आता ए के हंगल. शंभरावं वर्ष आणखी काय काय दैवदुर्वीलास दाखवणार आहे ते आता बघायचे. मात्र 'शो मस्ट गो ऑन' चा मुलमंत्र चित्रपटजगताने जपलाय. जपत राहणार आहे. हा मंत्र हरपत असल्याची जाणीव जरी त्यांना झाली, तरी हंगल साहेब सगळ्यांना जागं करत विचारतील - ईतना सन्नाटा क्यु है भाई?
ए के हंगल पंचाण्ण्यव वर्षांचे होते. अनेक महिन्यांपासुन ते आजारी होते. त्यांच्यापेक्षा उण्यापु-या पाच वर्षांनी मोठ्या असलेल्या भारतीय चित्रसृष्टीशी त्यांचं नातं मात्र कायम होतं. अगदी हल्लीच, म्हणजे दोन वर्षांपुर्वी त्यांनी रिलायन्सच्या 'क्रिष्णा और कंस' या ऍनिमेशनपटात महाराज उग्रसेनासाठी रेकॉर्डिंग केलं होतं. हा सिनेमा या जन्माष्टमीच्या मुहुर्तावर प्रदर्शित करतांना "ए के हंगल यांनीही मोठ्या उत्साहाने आमच्यासाठी रेकॉर्डींग केलं," हे बिग ऍनिमेशन्सच्या आशिष कुलकर्णींनी किती म्हणुन अभिमानाने सांगीतलं होतं! 'मेकिंग ऑफ क्रिष्णा' मध्ये ए के हंगल यांचा स्पेशल बाईटही घेतलेला होता. ऍनिमेशनपटासाठी रेकॉर्डींग करणं ही कल्पनाच पुर्णतः नवीन असल्यामुळे आपण याला नवे आव्हान म्हणुन स्विकारल्याचं तेव्हा हंगल यांनी सांगींल्याचं लक्षात आहे. वयाची शंभरी गाठत असतांना नव्या कल्पनांचा आव्हान म्हणुन स्विकार करणा-या या 'ओल्ड मॅन' ला कोण बरं ओल्ड म्हणेल?
पण हंगल यांना 'ओल्ड मॅन' हेच बिरूद कायमचं जोडल्या गेलेलं होतं. सिनेमा समजायला लागला तेव्हापासुन त्यांना म्हाता-याच्याच भुमिकेत पाहिल्याचं आठवतं. टिव्हिवरच्या कुठल्याश्या कार्यक्रमात 'अनेकांना चिरतारूण्याचं वरदान लाभतं तसं हंगल यांना चिरवार्धक्याचं वरदान लाभलंय' असली काहीतरी टिप्पणी ऐकलेली आज आठवतेय. वार्धक्य हे वरदान म्हणावं की नाही, हा प्रश्नच आहे, पण हंगल यांनी मात्र त्याचा उपयोग वरदानासारखाच केला, हे सांगणे न लगे.
बावर्ची मधला त्यांनी रंगवलेला मोठा काका असो, किंवा 'ओ हो हो दिपिकाजी आईये आईये' म्हणणारा त्यांचा हसमुख दुकानदार असो, 'नरम गरम' मधला त्रस्त झालेला कुशी चा बाप असो किंवा अगदी लगान मधला त्यांचा 'पानी तो बरसाओ' म्हणुन आकाशाकडे टक लावून पहाणारा गावातला सर्वात वयोवृद्ध म्हातारा असो; यात त्या त्या व्यक्तीरेखेबरोबरच तितक्याच प्रभाविपणे लक्षात राहतो तो ए के हंगल नावाचा कलाकार!
हंगल यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं तेच मुळी त्यांच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी. त्यामुळे चरित्र भुमिका हेच त्यांचे क्षेत्र राहणार हे नक्कीच होतं. चित्रपटसृष्टीत येण्याआधी आणि त्यानंतरही हंगल कम्युनिस्ट पक्षाचे खंदे कार्यकर्ते होते आणि राहिले. त्यांच्या जुन्या आणि पक्क्या साम्यवादी विचारांच्या पायाचा वापर त्यांनी रंगमंच आणि नंतर चित्रपटसृष्टीमध्येही एक आदर्शवादी आणि सामान्य भारतीय मध्यमवर्गीय व्यक्तीरेखा उभ्या करतांना खुप चांगल्या पद्धतीने करून घेतला. आर के लक्ष्मण यांचा 'कॉमन मॅन' हंगल यांच्यासारखा दिसत नसेलही कदाचित; पण ईंडियन कॉमन मॅन म्हटलं की हंगल यांनी रंगवलेल्या व्यक्तिरेखाच समोर येतात.
समाजकारण, रंगमंच, चित्रपटक्षेत्रातली चार दशके, टिव्हीवर गाजवलेला एक काळ, आणि नुकतीच बदलत्या काळातल्या डेली सोपमध्ये 'मधुबाला' च्या माध्यमातुन घेतलेली एक छोटीशी एन्ट्री -- ए के हंगल या एका व्यक्तीने पंचाण्णव वर्षाच्या आयुष्यात केलेलं मल्टीटास्कींग थक्क करणारं आहे. हे सगळं करतांना आपला व्यासंग, विचार आणि 'सन्नाटा' यांच्याशी असलेलं आपलं नातं त्यांनी नेहमी जपलं. त्यांचं काम सुरू राहिलं ते त्यांनी केलेल्या भुमीकांप्रमाणेच साध्या आणि सरळ पद्धतीने. चित्रसृष्टीने त्यांची हवी तशी दखल घेतली, न घेतली हा विषय हंगल यांच्या उतारवयात त्यांच्यासाठी फार अलाहिदा होता. स्टॅंड-अप कॉमेडी शोजचं भरमसाठ पीक येऊ लागलं तेव्हा हंगल साहेब आणि त्यांचा सन्नाटा हा विनोदाचा विषय झाला.
हंगल साहेबांनी याकडे लक्ष दिलंच नाही. नवं काहीतरी करण्याचा त्यांचा शोध सुरू राहिला.
या वर्षी चित्रपटसृष्टीला शंभर वर्ष पुर्ण झालीत की तीची शंभर वर्ष भरलीत हे कळायला मार्ग नाहीय. देव आनंद, राजेश खन्ना, दारा सिंग, आणि आता ए के हंगल. शंभरावं वर्ष आणखी काय काय दैवदुर्वीलास दाखवणार आहे ते आता बघायचे. मात्र 'शो मस्ट गो ऑन' चा मुलमंत्र चित्रपटजगताने जपलाय. जपत राहणार आहे. हा मंत्र हरपत असल्याची जाणीव जरी त्यांना झाली, तरी हंगल साहेब सगळ्यांना जागं करत विचारतील - ईतना सन्नाटा क्यु है भाई?