जागृत करुनी
निरंकारा।निर्गूण आणिले आकारा॥
त्रिविध गुण
लावूनी संसारा।रचिला जगडंबर सारा।
भू:जल तेज
गगनवारा।बहु तत्वांच्या परिवारां॥
उत्पत्ती
स्थिती संहारा।लाविले हिने विधी हरिहरा॥
करुनी परिमाण,केले निर्माण,जगाचे प्राण,सकळही सृष्टी मुळारंभा।
आपल्या
परंपरांना प्रमाण मानलं तर आदिशक्तीच्याच प्रेरणेने विश्वाची निर्मीती झाली असं
म्हणावं लागेल. अर्थात, कुणीही विज्ञानवादी ही गोष्ट मानणार नाही. कुणातरी एका देवीने निराकार विश्व
जागृत करून जगाची निर्मीती केली, ही गोष्ट खरोखरच विज्ञान मानणा-या मनाला
पटत नाही. विश्वनिर्मितीच्या पाऊलखुणा शोधत शोधत आता आपण बिग बॅन्गपर्यंत येऊन
पोचलो आहोत. बिग बॅन्ग हे विश्वाच्या निर्मीतीचे कारण आहे, ही गोष्ट मानली, तर हा महास्फोट होण्यामागे काहीतरी कारण असायला पाहिजे. कदाचित उद्या जाऊन
विज्ञान ते कारणही शोधून काढेल की कसल्यातरी 'बिग चेंज' मुळे हे बिग बॅन्ग घडले. परत प्रश्न आलाच, की हा बिग चेन्ज कुणी घडवून आणला!
मुळ काय? प्रश्नातून प्रश्नच जन्म घेत राहतील, जर 'वैज्ञानिक
दृष्टीकोनाच्या' नावाखाली आपण आपल्याकडे मुळात असलेल्या उत्तराकडे दुर्लक्षच करत राहू!
कसलीतरी प्रेरक
शक्ती या सर्व घटनांच्या मागे आहे, यावर तर कुणाचंच दुमत नसावं. याच
प्रेरक शक्तीची आपल्या संस्कृत्तीने आदिशक्तीचे नाव देऊन पुजा बांधली आहे.
आदिशक्ती ही एक कोण एक स्त्री किंवा देवी नाही. ते एक तत्त्व आहे.
विश्वनिर्मितीमागची, सजीवतेची प्रेरणा देणारी एक शक्ती. छोटीशी मोपेड गाडी असो वा सुखोई विमान, ते सुरू करण्यासाठी एक ईग्नीशन लागतंच. चावी फिरवावी लागते. नॉब खालून वर
करावा लागतो. बटण दाबावं लागतं. ही चावी, नॉब किंवा बटण म्हणजे जर 'बिग बॅन्ग' असेल तर ती फिरवणारे हात म्हणजे आदिशक्ती.
हे हात कुणीच
पाहिले नसतात, कारण चावी फिरवून, बटण दाबून आणि मशिन सुरू करून ते बाजुला झालेले असतात. आपण या जीवसृष्टीच्या
मशिनमध्ये आत कुठेतरी फिरणारे पुर्जे असतो.
आपल्याला कुठे दिसणार चालवीणा-याचे हात? पण म्हणुन चालवणारे हात तीथे
नाहीतच असं अजीबात नसतं. चालवणारा आहे तोवरच गाडी सुरू राहू शकते. आपल्या
जीवसृष्टीची गाडी सुरू आहे. म्हणजे चालवणारे हात आहेत. हे हात म्हणजेच आदिशक्ती.
निर्गुण
निराकाराची संकल्पना मुळात समजणंच कठीण. आपल्यासारख्यांच्या डोक्याच्या अगदीच
बाहेर. म्हणुनच कदाचित आपल्या समाधानासाठी किंवा सोयिसाठी आपण या अदृ:श शक्तीला
दृ:श रूपात आणलं. मग ही जीवन देणारी शक्ती असल्याने सहाजीकच तीला मातेचं, स्त्रीचं रूप मिळालं. पुढे वाईट शक्तींचा अंत करण्यासाठी ज्या स्त्रीयांनी
शस्त्रे हाती घेऊन अतुल पराक्रम गाजवला, त्यांना याच प्रतिमेशी जुळवून
त्यांच्या दंतकथा निर्माण झाल्या. शेवटी सगळ्या रूपांना केलेला नमस्कार जाऊन
मिळतोय तो एकाच ठीकाणी.
वैदिक काळातील
ऋषिंमुनिंना सुर्यमालेतले नऊ ग्रह कुठल्याही हाय-एन्ड टेलिस्कोपशिवाय दिसले, त्यांच्या भ्रमणकक्षा, त्यांचा भ्रमण कालावधी, त्यांच्यावरील दिवस-रात्रीची गणितंही समजली, यावरूनच आजच्या
कुठल्याही वैज्ञानिकापेक्षा त्यांची समज जास्त होती हे सिद्ध होते. त्यांनी या कथा, ही रूपं वर्णन केली. म्हणजे नेमकी हीच रूपं रंगवण्यामागे काहीतरी अभ्यास, हेतू असला पाहिजे हे नक्की.
म्हणुनच
आदिशक्ती जरी कुणालाच दिसणारी नसली, तरी तीची ही दर्शनी रूपं त्या मुळ
रूपाच्या खुप जवळ नेऊन ठेवणारी आहेत, असं म्हणायला हरकत नाही. म्हणुनच
देवीच्या नऊ रूपांपैकी पहिलं रूप निर्गुण आदिशक्ती आहे. आणि नंतर सुरू होतात ते
तीने स्वतः रचलेल्या या जगडंबराच्या कल्याणासाठी निर्माण झालेली तिचीच ईतर रूपे.
No comments:
Post a Comment